पालींचा पालक : वरद गिरी

पालींचा पालक : डॉ. वरद गिरी

कर्नाटकातील ‘अंकली’ या लहानश्या गावातून आलेल्या या तरुणाला दहावीत फक्त बावन्न टक्के, बारावीतही जेमतेमच गुण..! बि.एस.सी. नंतर कीटकशास्त्रात स्नातकोत्तर पदवी पूर्ण होईपर्यंत त्याला आपल्या वाटचालीचा थांगपत्ताही न लागावा असाच हा किस्सा आहे. भविष्यात जागतिक ख्यातीचा सरीसृपतज्ञ होईल याची साधी कल्पनाही त्याच्या डोक्याला शिवली नाही. प्राणीशास्त्रात आचार्य पदवी पूर्ण करून बि.एन.एच.एस. या भारतातील नामांकित संस्थेत काही काळ नोकरी करेल. एन.सी.बि.एस. (National Centre for Biological Science) मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम काय करेल. अन पाहता पाहता हा अवलिया भारतीय सरीसृपांचे जग समृद्ध करेल. हे सगळे काही त्याला आणि जगालाही अनाकलनीय आहे. जेंव्हा त्याच्या या प्रेरणादायी प्रवासाकडे मी पाहतो तेंव्हा अक्षरशः अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.

पाली, साप, सरडे अन बेडूक यांच्यासाठी जगणारं ‘वरद भगवान गिरी’ नावाच हे रसायन जरा आगळेवेगळचं आहे. निर्मळ, निखळ व अस्सल मैत्रीचा ओलावा असेलला वरद जेंव्हा बोलतो आपल्याशी तेंव्हा आपण तल्लीन होऊन त्याला ऐकतो. ‘आपण आज आहोत, उद्या नाही. निसर्ग इथेच आहे. निसर्ग शाश्वत आहे.’ हे वाक्य तो नेहमीच उच्चारतो. यातून आपण आपले पाय जमिनीवर राहून कस जगायचं याची प्रचीती येते. जगण्यातला साधेपणा आणि वागण्याचा हा जमिनीवरचा सूर अतिशय मनभावक आहे. कायम मातीत जगणारा, मैत्री जपणारा शास्त्रज्ञ म्हणून डॉ. वरद गिरी यांचा मी नामोल्लेख करेल. डॉ. वरद गिरी म्हणजे सरीसृपांचा व उभयचरांचा चालता फिरता कोषच आहे. गिरी या आडनावाप्रमाने त्यांच कामही शिखरासम उंची गाठनार असच आहे. आपल्या लहानपणच्या जेमतेम परिस्थितीतल्या आठवणी अन महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून केवळ पाच हजार रुपये महिन्याच्या पगारावर नोकरी केल्याची आठवण सांगताना वरद भावूक होतो. यशाच उत्तुंग शिखर गाठूनही पाय जमिनीवर असलेला हा माणूस हेवा वाटेल असाच आहे. पश्चिम घाटात देवगांडूळ (Caecilians) शोधनाऱ्या वरद गिरी यांच्यात मला तेंव्हा देवच दिसतो. आपणही त्याच्या सहवासाने धन्य झाल्याची भावना मनात येते. माणस जोडण आणि त्यांच्यात मनापासून रमण ही खास शैली आहे. म्हणूनच तो नेहमी म्हणतो की, अरे मित्रा ही माणसच आपली खरी कमाई आणि संपती आहे.

सन २०१६ मध्ये डॉ.वरद गिरी अमरावतीला आले होते. म्हणून मी माझ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक नवीन मेजवानी द्यावी असे ठरवले. स्पर्धा परीक्षेच्या वर्गात ‘वरद’ स्वताला सांगताना विद्यार्थी साडेतीन तास निवांत ऐकत होते. डॉ. वरद गिरी हा तरुण फक्त शास्त्रज्ञच नसून उत्तम वक्ता देखील आहे हे मला तेंव्हा नव्याने कळलं. कारण त्या साडेतीन तासात वेगळेच वरद गिरी मी अनुभवलेत. ‘माय टुडेज स्पीच विल बि इन्स्पिरेशनल फॉर युवर स्टुडंट..!’असा तो म्हणाला होता. आचार्य पदवी (पी.एच.डी.) पूर्ण केल्यानंतरही हा माणूस स्वतःच्या नावापुढे कधीही डॉक्टर लावत नाही. ‘स्वताच्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी न लावणारा मी पाहिलेला हा पहिला माणूस आहे.’

डॉ. वरद गिरी हे नाव आज समाजाला नवखं नाही. तो कोण आहे, हे माहिती मायाजालाचे गुगल सर्च इंजिनच सांगते. ‘गिरिज ब्राँझबॅक स्नेक’, ‘गिरिज गेको’ व ‘गिरिज गेकोएला’ ही नावे गिरी यांचा परिचय होण्यासाठी पुरेसी आहेत. सरीसृपांच्या शोधून काढलेल्या प्रजातींपैकी संशोधकांनी वरद गिरी यांचेच नाव त्या प्रजातीला देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तरुण व उमद्या वयात हा बहुमान मिळणारे वरद गिरी जगातील आज निवडक संशोधकापैकी एक आहेत. इतकंच काय तर आजवर त्यांनी किमान ६० हून अधिक नव्या प्रजातींची शोध लावलाय. आशिया खंडातील एकमेव पिल्ल देणारं देवगांडूळ सुद्धा त्यांनीच शोधून काढलंय. आजवर त्यांच्या नावाने पन्नासहून अधिक शोध निबंध प्रसिद्ध असून ते एका पुस्तकाचे ते लेखक सुद्धा आहेत. आजवर एकूण ९ प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहे. सँच्युरी एशीया वाइल्डलाइफ अवार्ड-२०१५ ज्या वेळी त्यांना मिळाला, त्यावेळी अनेक मान्यवरांनी या पुरस्काराला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया दिली. काही दिवसापूर्वीच त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतात पाच सरड्यांच्या नवीन प्रजाती शोधून काढल्या. एक नवीन पोटजात (जीनस) शोधून त्याचं ‘सरडा’ या मराठी नावाने त्यांनी बारस केलंय. ‘सरडा’ या मराठी नावाची संशोधनपर शोधनिबंधाची ख्याती सातासमृद्रापार पोहोचली. डॉ. वरद गिरी यांनी आजवर अश्या पद्धतीने अनेक सरिसृपांचे बारसं केल आहे. त्याचं काम पाहता अन भारतीय वन्यजीव संशोधन या क्षेत्रासाठी त्याने दिलेलं योगदान पाहता ‘डॉ.वरद गिरी हे भारताची राष्ट्रीय संपती आहे.’ ‘वरद भगवान गिरी’ नावाच हे निसर्गाच वादळ असच चिरतरुण राहील. पायाला भिंगरी असणारा वरद साध्य आपल्या अर्धांगिनी क्षमता आणि दोन मुलांसह पुण्यात स्थायिक झाले आहे. येणाऱ्या पिढीला ते ‘निडस’ या संस्थेमार्फत सरीसृपांच विश्व उलगडून सांगत आहेत. एकूणच काय तर भारतीय सरीसृपांच्या संशोधनाच्या साम्राज्यावर डॉ. वरद गिरींचा ‘वरद’हस्त कायम राहील यात शंकाच नाही.

@ यादव तरटे पाटील

     दिशा फाउंडेशन, अमरावती

     संपर्क- ९७३०९००५००

     disha.wildlife@gmail.com

     www.yadavtartepatil.com

Yadav

Auther is a Member of Maharashtra State Board for Wildlife, wildlife conservationist, eminent nature activist, columnist & working for wildlife, environment & for tribal youth since 20 years. He is also working for anti-poaching, green administration & green journalism. He is also Founder of Disha foundation, Amravati based Organisation.

Recent Posts

तरुणांनो वन्यजीवांची हाक ऐका…..!

वन्यजीव संवर्धन ही सर्वच देशातील नागरिकांची प्राथमिक जबाबदारी आहे. विशेष करून तरुणांची यात महत्वाची भूमिका…

3 years ago

मी चष्मेवाला

मी आहे चष्मेवाला..! पण मी चष्मा नाही लावत बर का..? आणि हो मी ‘मामा की…

3 years ago

वेडा नसलेला ‘वेडा राघू’

छोटा पाणपोपट हा पक्षी वेडा राघू नावानेच अधिक परिचित आहे. या पक्ष्याच आपण 'वेडा राघू'…

3 years ago

फ्रेंडशिप डे निसर्गाचा…!

एका गावात एका मुलीला उडणारे पक्षी खूप आवडायचे, पण एक दिवस राजा अचानक पक्षी मारायचं…

4 years ago

Beauty with Poison…!

Are butterflies poisonous? You will be perplexed if you ask this question. We know that…

4 years ago

सौंदर्यात दडलंय विष…!

फुलपाखरे विषारी असतात का.? हा प्रश्न विचारला तर तुम्ही नक्कीच बुचकळ्यात पडाल. साप, विंचू व…

4 years ago